Maharashtra News: महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी! छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा अखेर युनेस्कोच्या यादीत समावेश

Chhatrapati Shivaji Maharaj Fort : महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड आणि किल्ल्यांना जतन केले जाण्याची मागणी नेहमीच केली जात होती.
Maharashtra FORT .jpg
Maharashtra FORT .jpgSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News: महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड आणि किल्ल्यांना जतन केले जाण्याची मागणी नेहमीच केली जात होती. जगाच्या इतिहासात एकमेक अशा महान राजाचा हा वारसा जतन करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. अखेर महाराजांच्या 12 गड आणि किल्ल्यांना (Fort) वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळाला असून त्यांच्या युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

युनेस्कोच्या शुक्रवारी (ता.11) पार पडलेल्या बैठकीत शिवनेरी किल्ल्यापासून ते स्वराज्याची पहिली आणि दुसरी राजधानी असलेल्या राजगड आणि रायगड किल्ल्यांसह 12 किल्ल्यांना जागतिक वारसा (युनेस्को) यादीत स्थान देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार हे या बैठकीला उपस्थित होते.

काही महिन्यांपूर्वीच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचे (Maharashtra Government) शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे. या शिष्टमंडळानं शिवनेरी किल्ल्यापासून ते स्वराज्याची पहिली आणि दुसरी राजधानी असलेल्या राजगड आणि रायगड किल्ल्यांसह 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळावे अशी आग्रही मागणी केली होती. अखेर या मागणीला यश मिळालं आहे.

'या' किल्ल्यांचा समावेश वारसा यादीत समावेश

युनेस्कोच्या यादीत रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. युनेस्कोच्या यादीत प्रस्ताव महाराष्ट्र सरकारचे चार सदस्यांचे शिष्टमंडळ 22 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे गेले होते. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले होते.

Maharashtra FORT .jpg
Uddhav Thackeray On Jansurksha Bill: 'जनसुरक्षा' विधेयकातील 'ती' चूक दाखवत 'मविआ' संतापली; उद्धव ठाकरेंचाही फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्यादरम्यान, या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात आले होते. आता युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होणार आहे. आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसाचा जतन आणि त्याचे महत्त्व वाढून त्याचे ऐतिहासिक पर्यटन देखील होण्यास मदत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com