MP Imtiaz Jalil
MP Imtiaz JalilSarkarnama

Nagar Political : 'एमआयएम'ची नगरमध्ये चाचपणी ; राष्ट्रीय पक्षांची डोकेदुखी वाढणार...

Curious about how many seats will be contested : किती जागांवर लढणार याची उत्सुकता.
Published on

Nagar Political : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलीस - ए - इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने महाराष्ट्रातील काही जागांवर चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे राज्यात 'एमआयएम' किती जागांवर लढणार याची उत्सुकता आहे. पक्षाने राज्य संघटनेकडून चाचपणी सुरू केली असून, यातून काय निष्कर्ष निघतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात गेल्यावर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदुत्वाचे प्रयोग झाले. यातून जातीय दंगली उसळल्याच्या घटना घडल्या. नगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, अमरावती, जळगाव, नाशिक, बीड जिल्ह्यांमध्ये कुठे ना कुठे आणि कोणत्या ना कोणत्या कारणातून जातीय दंगली झाल्याच्या नोंदी आढळतात. यातून समाज होरपळा गेला. या जातीय दंगलीनंतर हिंदू महाराज मैदानात उतरले होते.

MP Imtiaz Jalil
Sangli Politics : आटपाडीचे नेतृत्व नक्की कोण करणार? देशमुख की पडळकर?

यावर राज्यातील दिग्गज नेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. हे हिंदुत्वाचे प्रयोग असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र, याचा फायदा काही राजकीय पक्षांना घेण्याचे गणित आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बदलली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुका होत आहेत. महाविकास आघाडी, इंडिया आघाडी आणि भाजप महायुती लोकसभेला समोरे जात आहे.

यात एमआयएम हा पक्षदेखील महाराष्ट्रात लोकसभेसाठी स्वतंत्र चाचपणी करत असल्याचे दिसत आहे. या पक्षाची महाराष्ट्रात ताकद जरी कमी असली, तरी गेल्या वर्षीच्या दंगलीत ज्या अल्पसंख्याक, मागासवर्गीय, दलित घटक, बहुजनांना झळ बसली, तो समाज 'एमआयएम'च्या अजेंड्याखाली येताना दिसत आहे. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची 2018 मध्ये युती झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यात महाराष्ट्रात 2019 मध्ये लोकसभा निवडणूक युतीने लढवली. यात इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा जिंकली. हैदराबादच्या बाहेर पहिल्यांदाच एमआयएमने लोकसभेची जागा जिंकली. खासदार जलील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राज्यभरात त्यांनी पक्षाच्या संघटनेचे जाळे विणले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम त्यांनी केले आहे.

या लोकसभा निवडणुकीतदेखील एमआयएम निवडणुकीच्या तयारी आहे. राज्यात किती जागा लढवणार यावर चाचपणी करत आहे. यासाठी राज्यतील पक्ष संघटनेचे प्रमुख पदाधिकारीदेखील उत्सुक आहेत. पक्ष संघटनेकडून जिथे काम तिथे चाचपणी केली जात आहे. या वेळी 'एमआयएम'चे नगर जिल्हाध्यक्ष डाॅ. परवेझ अशरफी म्हणाले, "महाराष्ट्रात गेल्यावर्षी अनेक भागांमध्ये जातीय दंगली झाल्या.

यात नगर जिल्ह्यात जास्तच दंगली झाल्या. यात अल्पसंख्याक समाज टार्गेट झाला. नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात झालेल्या जातीय दंगलींमध्ये पक्षाने अल्पसंख्याक समाजाबरोबर बहुजनांची बाजू चांगल्या पद्धतीने लावून धरली. त्यामुळे पक्षाचे काम दिसते. यात पक्षाच्या कामाचे आणि संयमाचे बहुजनांकडूनदेखील कौतुक होत आहे.

पक्ष संघटनेच्या कामामुळे युवा वर्गदेखील संघटनेबरोबर आहे". सकारात्मक परिस्थिती असल्याने नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाविषयी अहवाल प्रदेशाध्यक्ष खासदार जलील यांच्याकडे सादर करणार आहे. यानंतर प्रदेश पातळीवर काय निर्णय येईल, त्यापद्धतीने लोकसभा निवडणुकीत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MP Imtiaz Jalil
Anant Geete : तटकरेंना मिळालेली मतं जाधवांची होती, आता तेच सोबत...! गीतेंनी रणशिंग फुंकले

'एमआयएम'चे पक्षीय बलाबल...

'एमआयएम'चा महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खासदार आहे. याशिवाय विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतींमध्ये चांगला स्कोर आहे. विधानसभा 2019 मध्ये 'एमआयएम'ने मालेगाव (मध्य) आणि धुळे (शहर) मतदारसंघात विजय मिळवला. या वेळी 'एमआयएम'ला 7 लाख 37 हजार 888 (1.34%) मते मिळाली होती.

महानगरपालिकेत छत्रपती संभाजीनगर 25, अमरावती 10, सोलापूर 9, मालेगाव 7, धुळे 4, मुंबई 2, ठाणे 2, कल्याण 2 आणि पुणे 1 जागा जिंकली आहे. महाराष्ट्रात एकूण 62 नगरपालिका नगरसेवक, 40 नगरपरिषद, 102 ग्रामपंचायत सदस्य आणि एक जिल्हा परिषद सदस्य आहेत. गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे आता या पक्षाचा फॅक्टर कितपत यशस्वी ठरतो, हे निश्चित नाही.

तेलंगणातील यशामुळे आत्मविश्वास

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत 'एमआयएम'ने मोठे यश मिळवले आहे. नऊपैकी सात जागांवर विजय प्राप्त करून राष्ट्रीय पक्षांना जाणीव करून दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत हा राष्ट्रीय पातळीवर किती जागा लढवणार, याची उत्सुकता आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत.

आता लोकसभा निवडणुका होत आहे. यात 'एमआयएम' किती ताकदीने उतरतो, याकडे लक्ष लागले आहे. तेलंगणा निवडणुकीत मिळवलेल्या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. यातूनच महाराष्ट्रात लोकसभेची चाचणी होत आहे.

(Edited by Amol Sutar)

MP Imtiaz Jalil
Dharashiv Loksabha : मैदानात तर या..! ओमराजेंनी भाजपला दिले आव्हान...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com