NCP MLA Disqualification Case: 'नार्वेकरांच्या मनात आमच्या बाजूने निकाल द्यायचे...', जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

Jayant Patil : विधानसभेचे लोकप्रतिनिधी जर एका बाजुला गेले तर त्यांच्या बाजुला पक्ष जात नसतो. सदस्य संख्येचा निकष हा चुकीचा आहे. आता निर्णय द्यायचाच ठरल्यावर तो कसाही दिला जातो
Jayant Patl, Rahul Narwekar
Jayant Patl, Rahul Narwekar sarkarnama
Published on
Updated on

Nagar : शरद पवार गटाला आता 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' असे नाव निवडणूक आयोगाकडून मिळाले आहे. पुढील रणनिती ठरवण्याच्या आधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रते प्रकरणी काय निकाल देणार, याकडे पक्षातील नेत्यांचे लक्ष लागले आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे काय निर्णय देतील याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. (NCP MLA Disqualification Case)

Jayant Patl, Rahul Narwekar
NCP News : अजितदादांच्या नावाची कोनशिला फोडली; 'राष्ट्रवादी'च्या दोन्ही गटांतील समर्थक भिडले

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) निकाल देणार आहेत. त्यांच्या मनात आमच्या बाजूने निकाल द्यायचे असेल आणि त्या अगोदरच मी त्यावर भाष्य करून घोटाळा करणे योग्य नाही. आम्ही आमची बाजू, साक्षी व्यवस्थित दिल्या आहेत. अपात्रतेची याचिका पहिल्यांदा आम्ही सादर केलेली आहे, अशी सावध प्रतिक्रिया जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभेचे अध्यक्ष न्याय देणार आहेत. न्याय देणाऱ्या व्यक्तीविषयी न्याय देण्याअगोदर काही विधाने करणे हे योग्य नाहीत. त्यांच्या मनात आमच्या बाजुने निकाल द्यायचा असेल आणि मी काहीतरी घोटाळा करून बसलो, तर सगळ्या पक्षाला ते भोगावे लागेल. त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. मला त्यांच्याकडून पूर्ण आशा आहे. विनाकारण काही बोलणे योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातील जनता न्याय करणार आहे. अंतिम न्यायालय जनता आहेच, असेही देखील जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.

'विधानसभेचे लोकप्रतिनिधी जर एका बाजुला गेले तर त्यांच्या बाजुला पक्ष जात नसतो. सदस्य संख्येचा निकष हा चुकीचा आहे. आता निर्णय द्यायचाच ठरल्यावर तो कसाही दिला जातो. न्यायालयात जायचे म्हटल्यावर, ते जा म्हणतात. न्यायालयाने आता लवकर तारखा दिल्या पाहिजेत. लोकसभा निवडणुका होण्याअगोदर न्यायालयाने निर्णय दिला पाहिजे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन महिने थांबून निकाल दिला आहे. ही आमची चुक नाही. सर्वोच्च न्यायालयात यावर आमचे वकील मुद्दे मांडतील', असे जयंत पाटील यांनी सांगितले.

छगन भुजबळांवर अन्याय व्हायचा...

मंत्री छगन भुजबळ आता भाजपकडे जात असल्याची चर्चा आहे, यावर जयंत पाटील यांना छेडले असता ते म्हणाले, 'अशा ऐकीव बातम्यांविषयी बोलणे मला योग्य वाटत नाही. परत त्यांच्यावर अन्याय व्हायचा. ते आमचे जुने सहकारी आहेत. परत तेच म्हणणार, मी इकडे निघालोय तिकडे निघालोय, असा कसा म्हणाला. त्यांचा निर्णय तेच करतील, त्यांच्याविषयी मी भाष्य करणे योग्य नाही.'

(Edited By Roshan More)

Jayant Patl, Rahul Narwekar
Akola News : राज्यात, केंद्रात भाजपची सत्ता तरी मॉडेल रेल्वे स्टेशन होईना!!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com