Valmik Karad News: सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी काल संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खुलासा केला होता. यासंदर्भात त्यांनी वाल्मीक कराड यांच्याबाबत माहिती दिली. त्यामुळे दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्रात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात स्वामी समर्थ केंद्राचे आण्णासाहेब मोरे उर्फ गुरूमाऊली यांच्यावर थेट आरोप झाले आहेत. यात महिलांशी संबंधीत आरोप देखील आहेत. त्यामुळे आण्णासाहेब मोरे याबाबत आज सकाळी खुलासा करणार आहेत. ते काय खुलासा करतात, याची उत्सुकता आहे.
मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणाने सबंध महाराष्ट्र हादरला आहे. सध्या या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरारी आहे. त्यामुळे पोलीस प्रचंड दडपणाखाली आहेत. तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांनी नाशिकच्या पोलिसांवरील हा ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
फरारी संशयित वाल्मीक कराड व त्याचा सहकारी विष्णू चाटे हे १५ आणि १६ डिसेंबरला दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्रात मुक्कामी होते, असा खळबळ जनक आरोप करण्यात आले आहे. या संदर्भात तृप्ती देसाई यांनी सीआयडी चे पथक येथे येऊन गेले होते. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले होते मात्र याबाबत त्यांनी माहिती लपवली, असा गंभीर आरोप केला आहे.
या आरोपाने नाशिकच्या अध्यात्मिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्र हे राज्यभर परिचित आहेत. त्यांचे राज्यात अनेक ठिकाणी केंद्र आहेत. त्या माध्यमातून एक मोठे अध्यात्मिक नेटवर्क त्यांनी तयार केले आहे.
या केंद्राबाबत गेल्या वर्षीही एक वाद निर्माण झाला होता. त्याचा संदर्भ देसाई यांनी आपल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. मुख्य म्हणजे बीड प्रकरणाशी संबंधित आरोपी येथे राहून गेल्याचा दावा त्यांनी केला आहे.
याबाबत अद्याप स्वामी समर्थ केंद्राकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र नाशिक जिल्ह्यातील अध्यात्मिक क्षेत्रात या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. श्रीमती देसाई यांनी याबाबत स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांच्याशी संबंधित एक गंभीर आरोप देखील केला आहे.
सध्या राज्यात बीड येथील प्रकरण चांगले चर्चेत आहेत यावरून राज्यात राजकारण तापले आहे विविध विरोधकांनी या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे नाशिकचे पोलीस यासंदर्भात काय भूमिका घेतात याची देखील उत्सुकता आहे.
स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांचे राज्यातील विविध राजकीय नेत्यांची संबंध आहेत. या केंद्राशी हजारो अनुयायी जोडले गेले तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपाने याबाबत स्वामी समर्थ केंद्राकडून काय भूमिका जाहीर केली जाते याची आता उत्सुकता आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.