Maharashtra Election Issue : ‘चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघात 15 दिवसांत 12 हजार परप्रांतीय मतदार कसे वाढले?’: काँग्रेसचा खडा सवाल

Congress questions to Chandrashekhar Bawankule : ‘मध्य प्रदेश, छत्तीसगड व इतर राज्यातील कामगारांना आणून त्यांना मतदार करण्यात आल्याचा थेट आरोप केला. भाजप कशी जिंकली, यासाठी हे एकमेव उदाहरण पुरेसे आहे, असा दावाही भोयर यांनी केला.
Chandrashekhar Bawankule-Suresh Bhoyar
Chandrashekhar Bawankule-Suresh BhoyarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 09 June : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजपने चोरली असा आरोप एका लेखाद्वारे केला होता. त्याला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना आपल्या कामठी मतदारसंघाचा अभ्यास करण्याचे आवाहन केले होते. त्याला काँग्रेसचे कामाठीतील पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत १२ हजार मतदारांची नोंदणी आयोगाने कशी काय केली, अशी विचारणा करतानाच ‘मध्य प्रदेश, छत्तीसगड व इतर राज्यातील कामगारांना आणून त्यांना मतदार करण्यात आल्याचा थेट आरोप केला. भाजप कशी जिंकली, यासाठी हे एकमेव उदाहरण पुरेसे आहे, असा दावाही भोयर यांनी केला.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजप महायुती सरकारने चोरली. अधिकाऱ्यांसोबत मॅच फिक्सिंग करून विधानसभेचा सामना जिंकल्याचा आरोप एक लेख लिहून केला होता. त्यानंतर काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांनी आरोप करण्यापूर्वी फक्त आपल्या कामठी विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास केला असता तरी काँग्रेस का पराभूत झाली, हे त्यांना कळाले असते, असा सल्ला दिला होता.

लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना कामठी विधानसभा मतदारसंघातून सुमारे १७ हजार मतांची आघाडी मिळाली होती. याच २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत कामठी मतदारसंघात (Kamthi constituency) ४ लाख ६६ हजार २३१ मतदार होते. त्यानंतर पाच महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. या कालावधित ३५ हजार ५३९ मतदार वाढले, ही वाढ कशी झाली, याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना चांगलीच माहिती आहे.

Chandrashekhar Bawankule-Suresh Bhoyar
Gore-Mohol : गोरेंच्या दमबाजीनंतर केंद्रीय मंत्री मोहोळांची सोलापुरातून मोठी घोषणा; म्हणाले ‘पालकमंत्री आता तरी मला परवानगी देतील...’

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यावेळी २३ हजार मतदार वाढल्याचे सांगण्यात आले होते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी सुरू केली. मतदानाच्या तीन दिवस अगोदरपर्यंत १२ हजारांच्या वर मतदारसंख्येत वाढ करण्यात आली, असा दावा सुरेश भोयर यांनी केला आहे.

Chandrashekhar Bawankule-Suresh Bhoyar
Raj-Uddhav Patch UP : राज अन्‌ उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याचे शहाजीबापू पाटलांनी सांगितले कारण; म्हणाले, ‘ते तर त्यांचे सोंग अन्‌ ढोंग...’

मतदार नोंदणी करताना कुठल्याच कागदपत्राची मागणी त्यांना करण्यात आली नाही. फक्त आधार कार्ड घेऊन त्यांना मतदार करण्यात आले होते. ते सर्व मतदार परराज्यातील होते. त्यांना मतदार करून भाजपने निवडणुकीत फायदा घेतला आहे, असा आरोप सुरेश भोयर यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com