Meat Ban: ...तर काँग्रेसच्या काळातील बंदी कशी कायम ठेवता? शशिकांत शिंदेंचा भाजपला सवाल

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मांसविक्री बंद ठेवण्याच्या महापालिकांनी काढलेल्या आदेशामुळं आता चांगलंच वादंग निर्माण झालं आहे.
Shashikant Shinde
Shashikant Shinde Sarkarnama
Published on
Updated on

नागपूर: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मांसविक्री बंद ठेवण्याच्या महापालिकांनी काढलेल्या आदेशामुळं आता चांगलंच वादंग निर्माण झालं आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी या बंदीला उघडपणे विरोध केला आहे. स्वातंत्र्यदिनाला धार्मिक रंग देण्याचं काम महायुती सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडं ही बंदी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाच लावण्यात आल्याचं प्रत्युत्तर भाजपच्या प्रवक्त्यांनी दिलं आहे. यावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

Shashikant Shinde
DRDOशी संबंधित व्यक्तीनं पाकिस्तानला पुरवली संवेदनशील माहिती! CID नं केली मोठी कारवाई

शशिकांत शिंदे म्हणाले, हा निर्णय काँग्रेसच्या कार्यकाळात घेतला गेला हे तुमचं म्हणणं खरं असेल तर तो कायम ठेवायचा की नाही? हे ठरवण्याचा निर्णय आता महायुतीला घ्यायचा आहे. तुम्ही तो लागू करता याचा अर्थ तुमचीही हीच इच्छा दिसते. लोकांनी काय खावं आणि काय नाही? याचा निर्णय सरकार घेणार असेल तर अवघड आहे असंही शिंदेंनी म्हटलं आहे.

Shashikant Shinde
कबूतरखान्यांची मुळे प्राचीन इतिहासात... मुघल दरबारात होती 20 हजारांची फौज

कबुतरखान्याच्या विषयात राजकीय भांडवल नको

दरम्यान, मुंबईतल्या कबुतरखान्यांच्या वादावरही शशिकांत शिंदेंनी आपली भूमिका मांडली. कबुतरखान्याच्या विषयालाही धार्मिक रंग दिला जात आहे. विधानपरिषदेत एका लोकप्रतिनिधींनी हा विषय उपस्थित केला होता. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणं कबुतरखाने बंद करण्याची कारवाई केली, त्यात कुठल्या धर्माचा विषय येत नाही. आपल्या आदेशात आरोग्याच्या विषयाला धरून मोठी टिप्पणी केली. त्याचं आता राजकीय भांडवल होत असेल तर ते योग्य नाही.

Shashikant Shinde
Meat Ban Controversy : प्रत्येक वेळी खाटीक समाजावरच अन्याय का? मांस बंदीच्या निर्णयावरून शिंदेंच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर

महाराष्ट्राला धार्मिक वादांची परंपरा नाही

राज्यात कुठल्याही विषयावरून धार्मिक वाद सुरू होतो. यापूर्वी महाराष्ट्रात अशी पद्धत नव्हती. आता मात्र धर्माला धरून अशा पद्धतीचा वाद निर्माण केला जातो. कबुतरखाने, मासांहार असे विषय उकरून काढून विकासाच्या मुद्याला बगल देणं आणि समाजासाठी तेढ निर्माण हे योग्य नाही. याला महायुती सरकार जबाबदार आहे. या वादात महाराष्ट्रातील शेतकरी, बेरोजगारी, आत्महत्या हे विषय बाजूला पडले आहेत. मागील काही वर्षांपासून धर्मवाद उभा केला जात आहे. एखादे कारण मिळाले की त्याचं राजकीय भांडवल केलं जात आहे. ज्यांनी पेरलं तेच आता उगवत असल्याचं सांगून शिंदे यांनी भाजप व महायुतीवर याचं खापर फोडलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com