
Mumbai News : नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याप्रसंगी माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी केलेल्या वक्तव्यानंतर त्याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट प्रतिक्रिया ऐकवयास मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. कदम यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तुटून पडले आहेत. ठाकरे सेनेचे माजी मंत्री अनिल परब यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत कदम यांनी केलेले सर्व दावे खोडून काढले आहेत. तर दुसरीकडे मंत्री नितेश राणेंचे पाहुणे स्वित्झर्लंड येणार होते का? असा सवाल करीत अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी अनिल परब यांनी मी रामदास कदम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करत असल्याचे स्पष्ट केले आहे. रामदास कदम यांची नार्काे टेस्ट झालीच पाहिजे. योगेश कदम यांनी स्वतःच्या बापाचे उद्योग तपासली पाहिजेत. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युपत्राचा मी स्वत: साक्षीदार आहे. रामदास कदम हे भाडगिरी करणारे लोक आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.
त्यासोबतच मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणांत स्वित्झर्लंडवरून विमानाने कोण येणार होते? कोण वाट पाहत होते? कोणत्या कागदपत्रांसाठी वाट पाहिली जात होती? असे आरोपही केले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा समाचार घेताना नितेश राणेंचे पाहुणे स्विझर्लंड येणार होते का? असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला आहे. मंत्री असलेल्या नितेश राणे यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी पुढे येऊन दिली पाहिजे. कोर्टात गेले पाहिजे अथवा पोलिसात तक्रार करण्यास हवी, अशी मागणी ही अनिल परब यांनी केली आहे.
डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आम्ही लगेचच बाळासाहेबांचा मृत्यु जाहीर केला. त्यामुळे हा जो आरोप केला जात आहे, त्या आरोपाचे सत्य बाहेरच आले पाहिजे. मेलेल्या माणसाचे ठसे घेतल्यावर त्याचा काहीही उपयोग होत नाही. कदमांनी माफी मागावी, नाही तर कायदेशीर कारवाई करणारच असे अनिल परबांनी स्पष्ट केले आहे.
'त्या' बाकड्याचा शोध घेतोय
मी विचारतोय की मातोश्रीमध्ये तो बाकडा कोणता आहे? जिथे रामदास कदम झोपायचे? तो बाकडा मी शोधतोय...अशा बाकड्यावर कोणाला झोपू देत नाही. मला माहितीये रामदास कदम कधी यायचे कधी जायचे, मी बाजूलाच राहतो, मी विभाग प्रमुख आहे, बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाला त्यावेळी मी विभाग प्रमुख होतो. त्यामुळे ही जबाबदारी माझ्याकडे होतो. 24 तास मी तिथे होतो. त्यावेळी जे काही घडलं त्याचा साक्षीदार मी होतो असेही पुढे अनिल परब यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.