Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बदललेली रणनीती यशस्वी ठरणार

Rahul Gandhi in Lok Sabha Elections : निवडणुकी नंतर राहुल गांधी या पदांवर होणार विराजमान ?
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Delhi News : यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने कुणाचीही पर्वा न करता मागासवर्गीयांवर दावा लावला आहे. अल्पसंख्याक आणि दलितांना देखील प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवले होते. यामाध्यमातून राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते म्हणून प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांची ही चाचपणी केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उत्तर प्रदेशात दोन महत्त्वाचे प्रयोग केले आहेत. एकीकडे त्यांनी  सवर्णांची पर्वा न करता मागास आणि दलित कार्ड खेळले, तर दुसरीकडे अयोध्येतील राम मंदिरात न जाऊन अल्पसंख्याकांना धीर दिला.

विशेष म्हणजे यूपीमध्ये केवळ 17 जागांवर लढत असताना राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते म्हणून बसवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला. आता हे प्रयोग कितपत यशस्वी होतात हे निवडणूक निकाला नंतर समजेल. 

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांना राष्ट्रीय अध्यक्ष केले. याद्वारे देशभरातील दलितांना एकत्र करण्याचा संदेश देण्यात आला. त्यानंतर राहुल गांधी यांनी न्याय यात्रा काढून जात जनगणनेचा मुद्दा जोरदारपणे मांडला.

Rahul Gandhi
Ahmednagar Lok Sabha Exit Poll : विखेंची भिस्त आता विठुरायावरच! एक्झिट पोलनंतर आत्मविश्वास डळमळला?

अजय राय यांना उत्तर प्रदेशचे अध्यक्ष बनवूनही त्यांच्या कार्यकारिणीत मागासवर्गीय आणि दलितांना पूर्ण सहभाग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. संविधान वाचवा, आरक्षण वाचवा परिषद, दलित संवाद आदी कार्यक्रमांतून राज्यात जात जनगणना व्हावी यासाठी जोरदार  समर्थन  करण्यात आले.

न्याय यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी राज्यातील जाती जनगणना आणि मागासवर्गीय आणि दलितांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. निवडणुकीच्या काळातही जातीगणनेच्या बहाण्याने त्यांनी केवळ सहभागाचा मुद्दा उपस्थित केला नाही तर माध्यमांवरही हल्ला चढवला. हा सुद्धा एक प्रकारच्या राजकीय डावपेचाचा भाग होता आणि मागासलेल्या लोकांना आणि दलितांना संदेश देण्याचा हा प्रयत्न होता.

राहुल गांधी यांनी  संविधान वाचवा या परिषदेच्या माध्यमातून दलित मतदारांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. चौथ्या ते सातव्या टप्प्यातील 54 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि सपाने ही बूथ समित्यांमध्ये सोशल इंजिनिअरिंग चा फॉर्म्युला स्वीकारला. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीत केलेले हे नवे प्रयोग मतांचे पीक घेण्याचे हत्यार ठरतात का, हे पाहावे लागेल. कारण हे प्रयोग यशस्वी झाले तर काँग्रेससाठी नवा मार्ग खुला होईल, पण ते अपयशी ठरले तर नवी रणनीती आखावी लागणार आहे. 

Rahul Gandhi
Nandurbar Election 2024: निवडणूक हिना गावितांची, भवितव्य विजयकुमार गावितांचे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com