Maharashtra Vidhan Sabha Election: आचारसंहिता उद्यापासून लागणार? शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक

Maharashtra Election Commission: लवकरच आचारसंहिता लागू होणार असून दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु सुरु आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election
Maharashtra Vidhan Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता (Maharashtra Vidhan Sabha Election) कधी लागणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून विविध निर्णय घेण्याचा सपाटा सुरु आहे. आजची मंत्रिमंडळांची बैठक सुरु झाली आहे. शिंदे सरकारची ही शेवटची बैठक असल्याचे बोलले जाते.

राज्यात उद्यापासून (मंगळवार) आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग मंगळवारी पत्रकार परिषद घेणार असल्याची शक्यता आहे. आचारसंहिता येत्या दोन तीन दिवसात लागू होणार असून दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला खूश करण्याचा सरकारने निर्णयांचा धडाका लावल्याचे दिसते. महाराष्ट्रात एक किंवा दोन टप्प्यात मतदान होऊ शकते. मात्र एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता अधिक असल्याचेही जाणकार सांगतात.

कुणल्याही क्षणी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपांच्या बैठका सुरु आहेत जवळपास सर्व जागांवर निर्णय झाला आहे. काही निवडक जागांबाबतचा पेच मात्र अद्यापही कायम आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election
Bachchu Kadu: पश्चिम महाराष्ट्रातील सहा मतदारसंघात बच्चू कडू नशीब आजमावणार

महायुती, आघाडीसोबत या निवडणुकीत तिसरी आघाडी देखील मैदानात उतरणार आहे. प्रहारचे बच्चू कडू, महाराष्ट्र स्वराज पक्षाचे संभाजीराजे आणि शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही तिसरी आघाडी यंदा महायुती आणि आघाडी सरकारच्या उमेदवारांना जेरीस आणणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election
Ambernath Assembly Election: तीन टर्म आमदार असलेल्या किणीकरांचा विजयरथ स्वपक्षातूनच रोखला जाणार?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात व मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. तर सत्ताधारी महायुतीला मतदारांनी दणका दिला. मात्र महायुती आणि महाविकास आघाडी दोघे एकाच माळेचे मणी आहेत, म्हणत राज्यात तिसऱ्या आघाडीचा घाट संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी या त्रिकुटाने घातला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 18 मागण्याचा प्रस्ताव आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी 25 सप्टेंबर पर्यंत दिलेली डेडलाईन संपल्यानंतर आज तिसऱ्या आघाडीचा संयुक्त मेळावे सुरु झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com