
Mumbai, 07 December : ईव्हीएम, निवडणूक आयोग आणि मारकडवाडी ग्रामस्थांना ‘मॉकपोल’ करण्याची परवानगी नाकारणाऱ्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज आमदारांच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीच्या आमदारांसह नेतेमंडळींनी आज विधीमंडळाच्या आवारात ‘आय लव मारकडवाडी’चे फलक झळकविण्यात आले. महाआघाडीच्या नेत्यांनी आज पुन्हा ईव्हीएमवर पुन्हा एकदा निशाणा साधला.
विधीमंडळात आज नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांना आमदारकीची शपथ देण्यात येत आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi ) नेत्यांनी आमदारकीच्या शपथविधीवर मारकडवाडी प्रकरणाचा निषेध म्हणून बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर त्यांनी विधीमंडळाच्या आवारात माध्यमांशी संवाद साधला. त्यात मारकवाडी आणि ईव्हीएमच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकावर हल्लाबोल केला.
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ( Markadwadi) ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रशासनाने त्यांना परवानगी नाकारली हेाती. तसेच गावात जमावबंदीचा आदेश दिला होता. या गावातील कार्यकर्त्यांसह आमदार उत्तम जानकर यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे.
आमदारांच्या शपथविधी सोहळ्यावरील बहिष्कारबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, महायुतीच्या विजयानंतरही राज्यात जल्लोष दिसत नाही. महायुतीचं बहुमत हे जनतेने दिलेले आहे की निवडणूक आयोग, ईव्हीएमने दिलेले आहे. आम्ही राजकीय पक्ष म्हणूनही हे प्रश्न उपस्थित केले आहेत. पण, सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी ‘मॉकपोल’ची मागणी केली होती. ‘मॉकपोल’ची सर्व तयारीही झाली होती. र्ह सर्व निवडणुकीच्या निकालानंतर मागितलं होतं.
माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनीही त्या मॉकपोलला पाठिंबा दिला होता. त्या गावकऱ्यांना प्रशासनाने परवानगी नाकारली होती. एवढंच नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून रात्री तब्बल २० गावकऱ्यांना अटक केल्याची माहिती आहे. आम्ही जिंकून आल्यानंतरही आमच्या मनात निवडणूक आयोग आणि ईव्हीएमबाबत शंका आहेत. त्यामुळेच आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेणार नाहीत, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, निकालानंतर ईव्हीएमविरोधात खदखद होती, त्यातून मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिस आणि निवडणूक आयोगा ग्रामस्थांच्या आड आले. पण, निवडणूक संपल्यानंतर निवडणूक आयोगाचे काम काय आहे. मारकडवाडी ग्रामस्थांना प्रशासनाने परवानगी नाकारली, तसेच या प्रकरणात पोलिसांचा हस्तक्षेप करण्याचे कारण काय होते. मारकडवाडीचे प्रकारण सरकारला दाबायचे आहे.
ईव्हीएम मशीन हॅक केली असे मी म्हणणार नाही. पण निवडणूक आयोगाने व्यवस्थित आरेंजमेंट करून दिली, त्यावर बोलावेच लागेल. मारकडवाडी हे आधुनिक भारताच्या मार्ग बदलण्याच्या कामाला सुरुवात करेल. लोकशाही वाचविण्यासाठी मारकडवाडीचे पाऊल महत्वपूर्ण ठरणार आहे. मारकडवाडीत उद्या (ता. ०८ डिसेंबर) शरद पवार येणार आहेत आणि त्यानंतर राहुल गांधी येणार आहेत, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.