Mumbai News, 04 Apr : सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या वादळी चर्चेनंतर लोकसभेत बुधवारी (ता.02) मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Amendment Bill) मंजूर झालं. त्यानंतर गुरूवारी राज्यसभेतही 12 तासांच्या चर्चेनंतर मध्यरात्री अडीच वाजता वक्फ सुधारणा विधेयक 128 विरुद्ध 95 मतांनी मंजूर झालं.
वक्फ विधेयक मंजूर झाल्याची माहिती सभापती जगदीप धनखड यांनी दिली. एकीकडे हे विधेयक मुस्लिमांवर अन्याय करणारं असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे हे गरीब मुस्लिमांच्या दृष्टीने हे बील फायदेशील असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.
देशासह महाराष्ट्रातील राजकारण देखील या विधेयकावरून चांगलंच तापलं होतं. अशातच आता वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार हे राज्यसभेत गैरहजर होते, अशी माहिती समोर आली आहे.
शिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकसभेतील दोन खासदार देखील वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी गैरहजर होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार राज्यसभेत गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे.
तर लोकसभेत या विधेयकाच्या मतदानावेळी खासदार अमोल कोल्हे आणि सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे दोघे देखील प्रकृती अस्वास्थ्यामुळे सभागृहात अनुपस्थितीत असल्याची माहिती आहे. मात्र, अतिशय महत्वाच्या विधेयकावर चर्चा सुरू असताना या नेत्यांची सभागृहातील अनुपस्थिती सध्याच्या चर्चेचा विषय बनली आहे.
त्यांच्या गैरहजेरीवरून विविध चर्चांना देखील उधाण आलं आहे. कारण राज्यातील महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेली ठाकरेंची शिवसेना या बिलावरून प्रचंड आक्रमक झाली आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या टीकेचा सामना करत खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) या बिलाला कडाडून विरोध केला.
शिवाय त्यांनी या बिलावरून सभागृहात देखील आक्रमक भाषण करत थेट अमित शहांवर निशाणा साधला. मात्र, आता आघाडीतील प्रमुख पक्षातील खासदाराच मतदानावेळी गैरहजर राहिल्यामुळे ठाकरेसेना यावर काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, राज्यसभेत विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून इंडिया आघाडी मुस्लिमांची दिशाभूल करत असून हे विधेयक मुस्लिम विरोधी नाही, ते गरीब मुस्लिमांच्या विकासासाठी आणल्याचा दावा केला.
तसंच केवळ वक्फ मालमत्तांचे कामकाजाच्या संदर्भात आणि व्यवस्थापना सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर हे बील आणल्याचं त्यांनी सांगितलं. तर हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवलं जाईल. त्यांनी अधिसूचना जारी केल्यानंतर हा कायदा लागू होईल, असंही त्यांनी राज्यसभेत सांगितलं.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.