Lok Sabha Election 2024 : चार टप्प्यांत 45 कोटींहून अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; महाराष्ट्र मागेच

Election Commission : निवडणूक आयोगाने पुढील तीन टप्प्यांत निवडणुकीचा टक्का वाढवण्यासाठी कंबर कसली असून तशा सुचना देशभरातील निवडणूक यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
Election Commission
Election CommissionSarkarnama

New Delhi : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) चार टप्पे पार पडल्यानंतर आता राजकीय पक्षांना पुढील तीन टप्प्यांतील मतदानाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रात मात्र एकच टप्पा उरला असून प्रचारही शिगेला पोहचला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानेही देशातील पुढील तीन टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. पहिल्या चार टप्प्यांमध्ये देशभरात सरासरी 66.95 टक्के मतदान झाले असून महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी 62.40 एवढी आहे.

लोकसभेसाठी देशात जवळपास 97 कोटी मतदारांची निवडणूक आयोगाकडे नोंद आहे. एकूण 543 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत चार टप्पे पूर्ण झाले आहेत. या टप्प्यांमध्ये 45 कोटींहून अधिक मतदानांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणुकीचे एकूण सात टप्पे असून अद्याप तीन टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. (Latest Political News)

Election Commission
Supreme Court on ED : …तर ‘ईडी’ आरोपीला अटक करू शकत नाही! सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आयोगाकडून (Election Commission) सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पण त्यामध्ये अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. आता तीन टप्प्यांमधील 163 जागांसाठी ही टक्केवारी वाढवण्यासाठी आयोगाचे प्रयत्न जोरकसपणे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत 66.14 टक्के मतदान झाले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यांत त्यामध्ये किंचित वाढ झाली. तिसऱ्या टप्प्यात हा आकडा एक टक्क्याने कमी झाला. तर चौथ्या टप्प्यांत दीड टक्क्यांनी मतदान वाढले. चार टप्प्यांतील सरासरी टक्केवारी 66.95 एवढी आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्र पिछाडीवर

महाराष्ट्रात (Maharashtra) चारही टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे. देशातील सरासरी मतदानाच्या तुलनेत महाराष्ट्रातील मतदान साडे चार टक्क्यांनी कमी झाले आहे. सर्वाधिक मतदान पहिल्या टप्प्यात तर सर्वात कमी मतदान चौथ्या टप्प्यात झाले आहे. या टप्प्यात केवळ 59.64 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

देशातील चार टप्प्यांतील मतदानाची टक्केवारी -

पहिला टप्पा - 66.14 टक्के

दुसरा टप्पा - 66.71 टक्के

तिसरा टप्पा - 65.68 टक्के

चौथा टप्पा - 67.25 टक्के

एकूण - 66.95 टक्के

महाराष्ट्रातील मतदानाटी टक्केवारी -

पहिला टप्पा – 63.71 टक्के

दुसरा टप्पा – 62.71 टक्के

तिसरा टप्पा – 63.55 टक्के

चौथा टप्पा – 59.64 टक्के

एकूण – 62.40 टक्के

Election Commission
Arvind Kejriwal : स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तनावर केजरीवालांची चुप्पी; पीए फिरतोय सोबतच

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com