
Pune, 02 May : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक गटाचे संयुक्त पॅनेल जाहीर झाले आहे. हे सर्वपक्षीय पॅनेल असल्याचा दावा या गटाने केला आहे. मात्र, पॅनेलमध्ये स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज (शुक्रवारी, ता. ०२ मे) शेवटचा दिवस होता. तत्पूर्वी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या पॅनेलची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यात अजितदादांनी एकाही माजी संचालकास स्थान न देता संपूर्ण पॅनेलमध्ये नव्याला संधी दिली आहे.
अजित पवार (Ajit Pawar)आणि पृथ्वीराज जाचक यांचा सर्वपक्षीय पॅनेल असल्याचा दावा त्यांच्या गटाकडून करण्यात येत आहे. मात्र, या पॅनेलमध्ये स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत तटस्थ राहण्याची घोषणा केली आहे.
पाटील म्हणाले, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गेली सहा महिन्यांपासून पृथ्वीराज जाचक आणि शरयू फाउंडेशनचे श्रीनिवास पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्येही यासंदर्भाने भेट झाली होती. पण जाचक आणि अजित पवार यांच्यात कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात युती झाली. त्यानंतर सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वपक्षीय मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पृथ्वीराज जाचक यांची भेटही घेतली होती. सुळे यांनी सर्वपक्षीय पॅनेलला शुभेच्छा देताना सहकारी साखर कारखान्यासाठी एकत्र येण्याची तयारी दाखवली होती. विशेष म्हणजे सर्वपक्षीय पॅनेलमध्ये सर्व पक्षांना प्रतिनिधीत्व देण्याचे ठरले होते. मात्र आज जाहीर झालेल्या पॅनेलमध्ये आमच्या पक्षाने सुचवलेल्या एकाही व्यक्तीला उमेदवारी नसल्याचे दिसून आले, असेही ॲड तेजसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.
ॲड तेजसिंह पाटील म्हणाले, छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनेल निश्चित करताना आमच्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे आमचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. श्रीनिवास पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पक्षाच्या सर्व उमेदवारींनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. आम्ही कारखान्याच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कोणत्याही उमेदवाराचा प्रचार नाही. पण योग्य उमेदवाराला मतदान करण्यात येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.