
Pahalgam Terrorist Attack : काश्मीरमध्ये दहशतवादाचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे कुटुंबीयांसोबत सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. मात्र हा हल्ला केवळ पर्यटकांवरील नव्हता, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर आणि जवळपास अडीच लाख कश्मिरींच्या रोजगारावर झालेला हल्ला होता. या हल्ल्याचे विविध परिणाम दिसत आहेत आणि आगामी काळातही दिसणार आहेत.
या हल्ल्यानंतर केवळ काश्मीरच्या आर्थिक विकासालाच ब्रेक लागला नाही, तर लाखो काश्मिरी नागरिकांच्या रोजगारावरही संकट निर्माण झालं आहे. पहलगामचा दहशतवादी हल्ला केवळ मनुष्य अन् वित्त हानीच नाही, तर काश्मीरची आत्मा कश्मीरियतवर झालेला थेट हल्ला असल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्यामुळे केवळ पर्यटकांचा विश्वासच तुटला नाही, तर काश्मीर घाटीचा आर्थिक कणा म्हटल्या जाणाऱ्या पर्यटन व्यवसायासही गंभीर संकटात ढकलले आहे. दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर चालवल्या गेलेल्या प्रत्येक गोळीने, काश्मीरच्या व्यवस्थेला अनेक वर्ष मागे ढकलले. या दहशतादी हल्ल्याचा काश्मीरवर नेमका काय परिणाम होईल, हे जाणून घेम्याचा प्रयत्न करूयात.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. ज्या लोकांनी काश्मीरला जाण्यास विमानाचे तिकीट बुक केले होते, त्यांनी पटापट तिकीट बुकींग रद्द करण्यास सुरुवात केली. एवढच नाहीतर काश्मीरमध्ये मोठ्याप्रमाणात हॉटेल अन् कॅबची बुकींगही रद्द होवू लागली आहे.
पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरसाठी कमाईच्या प्रमुख स्त्रोतांमध्ये पर्यटनाचे विशेष स्थान आहे. काश्मीरचा वार्षिक पर्यटन उद्योग तब्बल १२ हजार कोटी रुपययांचा आहे. एका अंदाजानुसार, वर्ष २०३० पर्यंत हा उद्योग वाढून २५ हजार कोटी ते ३० हजार कोटींपर्यंत पोहचणार होता. राज्याच्या एकूण जीडीपीत काश्मीरच्या पर्यटन व्यवसायाची सात ते आठ टक्के भागीदारी आहे.
मात्र पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याने पर्यटकांचा जीवे घेण्याबरोबरच काश्मीरच्या पर्यटन व्यवसायाचीही कबर खोदली आहे. पहलगामला भारताचे स्वित्झरलँड म्हटलं जातं. ज्या ठिकाणी दररोज शेकडो पर्यटक दाखल होत असतात. हा हल्ला अशावेळी केला गेला आहे, जेव्हा पर्यटक काश्मीरच्या पर्यटनासाठी मोठ्यासंख्येने येणार असतात. मात्र आता पर्यटनाचा हंगाम पूर्णपणे संकटात सापडला आहे.
काश्मीरमध्ये केवळ पर्यटनामुळे अडीच लाखांपेक्षाही अधिक लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि त्यांच्या कुटुंबाची तहान-भूक भागते. मात्र या दहशतवादी हल्ल्याने आता या अडीच लाख काश्मिरी लोकांच्या रोजगारावर संकट निर्माण झालं आहे आणि त्यांच्या कुटुंबाच्या अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे दिसत आहे.
काश्मीरमधील अनेक छोटे, मोठे हॉटेल्स ज्यामध्ये मोठ्यासंख्येने कर्मचारी काम करत असतात. मात्र आता पर्यटकांनीच जर काश्मिरकडे पाठ फिरवली दर येथील हॉटेल व्यवसाय कसा चालणार आणि यावर अवलंबून असणाऱ्यांचे काय होणार? असा प्रश्न आहे. तसेच दल सरोवरामध्येही १५०० पेक्षा अधिक हाउस बोट चालतात, ज्यामुळे हजारो जणांना रोजगार मिळत असतो, त्यांच्यासमोरही संकट निर्माण झालेलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.