Mahadevi Elephant News: 'महादेवी' हत्तीणीबाबतचा 'तो' एक निर्णय ठरला 'टर्निंग पॉईंट'; वनताराला घ्यावी लागली माघार

Mahadevi News: महादेवी हत्तीणीसाठी सोशल मीडियावरही मोठी मोहीम उघडण्यात आली होती. पण तरीही कोल्हापुरात तर नागरिक, विविध सामाजिक संघटनांनी संयमी आणि शांततेच्या मार्गानं लढा उभारला. यानंतर आता कोल्हापूरकरांनी उभारलेल्या आंदोलनासमोर वनतारा झुकलं आहे. पण 'महादेवी' हत्तीणीबाबतचा 'तो' एक निर्णय 'टर्निंग पॉईंट' ठरला, अन् वनताराला माघार घ्यावी लागली.
mahadevi elephant .jpg
mahadevi elephant .jpgSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जिनसेन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये हालवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही हत्तीण एक आठवड्यांपूर्वी गुजरात येथील जामनगरच्या वनतारामध्ये पाठविण्यात आली होती. ज्यानंतर कोल्हापुरसह राज्यभर याचा विरोध झाला. सोशल मिडियावर देखील यावरून संताप व्यक्त केला जात होता. कोल्हापुरात तर नागरिक, विविध सामाजिक संघटनांनी शांततामय पद्धतीने आंदोलन उभारले. यानंतर आता कोल्हापूरकरांनी उभारलेल्या आंदोलनासमोर वनतारा झुकलं आहे.

महादेवी हत्तीणीसाठी (Mahadevi Elephant) सोशल मीडियावरही मोठी मोहीम उघडण्यात आली होती. पण तरीही कोल्हापुरात तर नागरिक, विविध सामाजिक संघटनांनी संयमी आणि शांततेच्या मार्गानं लढा उभारला.यानंतर आता कोल्हापूरकरांनी उभारलेल्या आंदोलनासमोर वनतारा झुकलं आहे. पण 'महादेवी' हत्तीणीबाबतचा 'तो' एक निर्णय 'टर्निंग पॉईंट' ठरला, अन् वनताराला माघार घ्यावी लागली.

महादेवी हत्तीण आणि वनतारा प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची एन्ट्री झाली अन् तोच निर्णय टर्निंंग पॉईंट ठरला. तिथेच वेगानं सूत्रे फिरली. यावेळी महायुतीच्या प्रमुखांनी महादेवीला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची ग्वाही दिली होती. तसेच महादेवी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणणारच असल्याचा ठाम निर्धारही बोलून दाखवला होता. याचमुळे राज्य सरकारच्या दबावापुढे वनतारालाही झुकावं लागलं.

तर जनभावना पाहता या लढ्यात वनतारानेही एक पाऊल मागे घेत मोठा निर्णय घेतानाच महादेवी पुन्हा कोल्हापुरात लवकरच परतणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.याबाबत 'वनतारा'चे सीईओ विहान करणी यांनी माहिती दिली आहे.

mahadevi elephant .jpg
Meghana Bordikar viral post case : अजितदादांचा 'विजय'चा पुतण्या अडचणीत; मंत्री बोर्डीकरांच्या नावानं आक्षेपार्ह पोस्ट भोवली...

वनताराचे सीईओ विहान करणी बुधवारी(ता.6) कोल्हापुरा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आम्ही स्वामीजींजवळ आलो आहे, त्यांना माधुरीसाठी आम्ही नांदणी येथे घर बांधणार असल्याची विनंती केली.तसेच महादेवीबाबत जे काही निर्णय घेतले,ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केल्याचेही त्यांनी सांगितलं.

आम्ही प्राण्यांच्या सेवेसाठी हे सर्व केले. मठ, राज्य सरकार आणि वनतारा आम्ही तिघे मिळून न्यायालयात जाणार आहोत. यामध्ये पिटीशन टाकणार असून महादेवी हत्तीणीला घर बांधून तिला इकडे आणणार आहोत. याविषयी अनंत अंबानी यांनीही कोल्हापूरकरांच्या भावना दुखावणारे वर्तन करणार नाही, असा निर्णय घेतल्याची माहिती करणी यांनी दिली.

तिला वनतारामध्ये जी सेवा मिळेल, तीच नांदणीमध्ये मिळेल. माधुरी लवकर कोल्हापुरात येईल. यासंदर्भात चर्चा केली.नांदणी मठ, वनतारा, आणि राज्यसरकार फेऱ्याचिका दाखल करणार आहे. माधुरीचे सर्व अधिकार हे नांदणी मठाकडे राहतील, माधुरी हत्तीला सेवा आणि उपचार करणे ही वनताराची जबाबदारी असणार आहे, असे पत्रकार परिषदेनंतर मठाच्या स्वामीजींनी म्हटलं.

mahadevi elephant .jpg
Telangana Reservation: तेलंगाणानं काढला 42 टक्के ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश! राज्यपालांनी रोखलं; सत्ताधारी काँग्रेसनं घेतला मोठा निर्णय

वनतारानं एक निवेदन प्रसिध्द करत जनभावना पाहता या लढ्यात तेही सहभागी असल्याचे सांगितले होते. तसेच सर्व जनतेची माफी मागितली. या माफीनाम्यानंतर वनताराची टीम पुन्हा एकदा कोल्हापुरात दाखल झाली. यावेळी वनताराच्या टीमनं महाराज स्वामी यांच्यासोबत चर्चा केली. यामुळे महादेवीला कोल्हापुरात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वनतारानं काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्ही पावले टाकल्याचे सांगितलं होतं. पण राज्य सरकारच्या एन्ट्रीमुळे वनताराची मोठी कोंडी झाली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हत्ती तसेच इतर प्राण्यांची काळजी घेणाऱ्या वनतारा ही संस्था महादेवी हत्तीणीला घेऊन गेली होती. त्यानंतर कोल्हापुरात संताप व्यक्त करण्यात आला होता. आता राज्य सरकारने या प्रकरणी याचिका करणार असल्याचे समजल्यानंतर वनताराने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली होती.

mahadevi elephant .jpg
Pune Crime: 'ते' दोन अहवाल अन् पुण्यासह राज्यात खळबळ उडवणाऱ्या कोथरूड मारहाण प्रकरणाचं पितळ उघडं

माधुरीच्या देखभाल आणि सेवेबाबत वनताराने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. नांदणी गावातील जैन संस्थान मठ आणि कोल्हापूरच्या लोकांमध्ये माधुरीचे आत्यंतिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे, याची पूर्ण जाणीव वनतारास आहे. गेल्या अनेक दशकांपासून ती आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा भाग राहिली आहे. माधुरी कोल्हापुरातच रहावी अशी इच्छा आणि आपुलकी व्यक्त करणाऱ्या भक्त, मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव आणि आदर आम्ही करतो, असे वनताराने म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com