Jayant Patil : आदिती तटकरेंना पदापासून वंचित ठेवलं, 'एका महिलेवर हा अन्याय आहे' ; जयंत पाटलांनी सरकारला सुनावलं..

Aditi Tatkare News, Raigad Guardian Minister Post : रायगडचा पालकमंत्री ठरवण्यासाठी विलंब होणं हे आश्चर्यकारक असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
Aditi Tatkare, Jayant Patil
Aditi Tatkare, Jayant PatilSarkarnma
Published on
Updated on

Raigad Guardian Minister : जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज्यातील जिल्ह्यांची पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात रायगडच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या आदिती तटकरे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले हेही रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक होते. त्यातून आदिती तटकरे यांच्या नावाला विरोध झाला. शिवसेना शिंदे गटाने आक्रमक होत आंदोलने केली. त्यामुळे सरकारला रायगडसह नाशिकचेही पालकमंत्रीपद रद्द करावे लागले.

सुमारे चार महिने झाल्यानंतर रायगड व नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम आहे. अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यातही तो सुटू शकला नाही. या सगळ्या घडामोडी पाहाता यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सरकारला चांगलाच टोला लगावला आहे.

Aditi Tatkare, Jayant Patil
Chhagan Bhujbal : अजित पवारांवर नाराज असलेल्या भुजबळांकडून शरद पवारांना खास भेट, स्वगृही परतणार?

पाटील म्हणाले, रायगडचा पालकमंत्री ठरवण्यासाठी विलंब होणं हे आश्चर्यकारक आहे. आदिती तटकरे यांचे नाव पालकमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं होतं. आदिती तटकरेंच्या नावाची घोषना करुनही त्यांना पदापासून दूर ठेवणं काही बरं दिसत नाही. सरकारने यातून एका महिलेवर अन्याय केला आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. घोषणा करुनही त्यांना 'त्या' पदापासून वंचित ठेवणं हा अन्याय असल्याचं पाटील म्हणाले.

या सरकारकडून एका महिलेवर कसा अन्याय होतो हे यातून दिसतं. एका महिलेला कसं पालकमंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात येतं आणि चार महिने सरकार येऊन झाल्यानंतरही त्या जिल्ह्याला कोणी पालक नाही. अशी परिस्थिती असून ती काही योग्य नसल्याचं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रायगड दौऱ्यावर होते. सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी ते जेवणासाठी गेले होते. त्यावरुन तटकरे हे आपल्या लेकीच्या पालकमंत्रीपदाची सेटींग लावत असल्याचा आरोप त्यांच्यावर शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला. मात्र, यासंदर्भात बोलताना तटकरे यांनी पालकमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा अमित शाह यांच्यासोबत झाली नसल्याचे स्पष्ट केलं. त्यामुळे नक्की रायगडचा तिढा सुटणार तरी कधी असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

Aditi Tatkare, Jayant Patil
Bharat Gogawale : एकनाथ शिंदेंचा एकच फोन अन् गोगावले तातडीनं मुंबईला रवाना, घडामोडींना वेग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अमित शाह यांच्यात रविवारी सकाळी झालेल्या भेटीत रायगडच्या पालकमंत्री पदावरुन चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर लागलीच एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांना मुंबईला बोलावून घेतल्याने घडामोडींना वेग आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com