Ganesh Naik : "ठाणे आपलंच जिथं पाहिजे तिथं"; संपर्कमंत्रिपदी नियुक्ती होताच शिंदेंसेनेचा विरोध असलेल्या 'जनता दरबार'बाबत गणेश नाईकांचं मोठं वक्तव्य

Thane political conflict : एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमधील वाद हे उघड गुपित आहे. त्यामुळे ठाण्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठीच नाईकांना ताकद दिली जात असल्याचं बोललं जात आहे. ठाण्याचं संपर्कमंत्रिपद दिल्यामुळे ठाण्यात भाजपची मजबूत करण्याची जबाबदारी नाईकांवर देण्यात आली आहे.
Ganesh Naik
Ganesh NaikSarkarnama
Published on
Updated on

Thane News, 06 Feb : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे शहरात जनता दरबार घेणार असल्याचं वक्तव्य राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी करताच मोठा वादंग निर्माण झाला होता.

नाईकांनी ठाण्यात (Thane) जनता दरबार घेतला तर आम्ही पालघरमध्ये जनता दरबार घेऊ, असं प्रत्युत्तर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी दिलं होतं. यावरून नाईकांचा दरबार शिंदेसेनेला खटकल्याचं उघड झालं होतं. मात्र, अशातच आता भाजपने ठाणे जिल्ह्याचं संपर्कमंत्री केलं आहे.

त्यामुळे शिंदेंना भिडणाऱ्या नाईकांना भाजप जास्तीची ताकद देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर संपर्कमंत्रिपद मिळताच गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी मोठं विधान केलं आहे. "महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथे पाहिजे तिथे दरबार घ्यावा", असं त्यांनी म्हटलं आहे.

Ganesh Naik
Shivsena UBT Politics : विधानसभा गमावली पण महापालिकेसाठी शिवसैनिकांना चेतविण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे रणनीती बदलणार?

नाईक ठाण्यात आले होते यावेळी पत्रकारांनी ठाण्यात जनता दरबार कधी घेणार? असा प्रश्न विचारताच ते म्हणाले, "माझी ठाणे जिल्ह्याचा संपर्कप्रमुख मंत्री म्हणून नेमणूक झाली आहे. मी पालघरचा पालकमंत्री आहे. मात्र, जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी त्यांना जिथे पाहिजे तिथे दरबार घ्यावा."

तर जनता दरबारमध्ये लोकांच्या अडचणी समजून घेऊन दूर करणं हे चांगलंच आहे. मी सगळ्यांना सांगितलं आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) आणि अजित पवारांच्या सर्व मंत्र्यांना देखील नवी मुंबईमध्ये आणि प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घ्यावा. तसंच ठाणे आपल्या सगळ्यांचं आहे. ठाण्यात काय अडीअडचणी आल्या तर संबंधित अधिकाऱ्यांना देखील आपण बोलू, असंही ते म्हणाले आहेत.

Ganesh Naik
Mahayuti News : महायुतीमधील वाद मिटेना; दोन जिल्ह्यांतील पालकमंत्री निवडीचा तिढा काही सुटेना !

स्थानिकच्या निवडणुकीसाठी भाजपचा डाव

एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमधील वाद हे उघड गुपित आहे. त्यामुळे ठाण्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठीच नाईकांना ताकद दिली जात असल्याचं बोललं जात आहे. ठाण्याचं संपर्कमंत्रिपद दिल्यामुळे ठाण्यात भाजपची मजबूत करण्याची जबाबदारी नाईकांवर देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपने नाईकांकडे दिलेली ही जबाबदारी शिंदेंना घेरण्यासाठी टाकलेला डाव असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com