
Mumbai News, 25 Feb : नवी दिल्लीत पार पडलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील 'असे घडलो आम्ही' या परिसंवादात बोलताना नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe) यांनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केला आहे.
'ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena) दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं'; असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवाय या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.
एकीकडे नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका होत आहे. शिवाय त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्याची भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. त्यामुळे गोऱ्हेंच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांनीच गोऱ्हेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्याची सुत्रांची माहिती आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटात नाराजी पसरली असून त्यामुळेच त्यांची पाठराखण करण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याचं बोललं जात आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी असं वक्तव्य करण्याची गरज नव्हती, असं शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांचं मत आहे.
तर या प्रकरणावर आता गोऱ्हे यांनी स्वतःच प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडावी, अशी भूमिका देखील शिंदेंच्या नेत्यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय गोऱ्हे यांच्यावर ठाकरे गटाकडून जोरदार टीका होत असताना शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि ज्योती वाघमारे या दोघांनीच त्यांची पाठराखण केली आहे.
दरम्यान, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar) देखील नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता नीलम गोऱ्हे या सर्व प्रकरणावर नेमकं काय स्पष्टीकरण देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.