
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र: उद्धव आणि राज ठाकरे यांच्या सातत्याने सुरू असलेल्या भेटींनंतर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दोघेही एकत्र येणार असल्याची चर्चा राज्यभर रंगली आहे.
भाऊबीज निमित्त एकत्र येणार: ठाकरे घराण्याची दुसरी आणि तिसरी पिढी – उद्धव, राज, आदित्य, तेजस आणि अमित ठाकरे – भाऊबीज निमित्ताने शिवतीर्थवर एकत्र येणार आहेत.
चित्रा वाघ यांचा उपरोधिक दावा: भाजप आमदार चित्रा वाघ यांनी म्हटले की “देवेंद्र फडणवीसांमुळे दोन्ही ठाकरे भाऊ एकत्र आले” आणि ठाकरेंच्या बहिणींनी त्यांचे आभार मानावेत.
Mumbai, 23 October : राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीवर काय परिणाम होणार, याची चर्चा रंगलेली असतानाच भाजप आमदार चित्रा वाघ यांनी वेगळाच दावा केला आहे. ‘ठाकरेंच्या बहिणींनी आमच्या देवाभाऊंचे आभार मानले पाहिजेत,’ असे सांगून त्याचे कारणही स्पष्ट केले आहे.
मराठीच्या भाषेच्या मुद्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे हे प्रथम एकत्र आले होते. त्यानंतर या दोन्ही बंधूमध्ये सातत्याने गाठीभेटी होत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांकडून विशेषतः भाजपचे नेते ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत आक्रमकपणे बोलताना दिसत आहेत.
भाऊबीजेच्या निमित्ताने राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे हे आज शिवतीर्थवर एकत्र येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, तेजस, आदित्य आणि अमित ठाकरे ही ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी भाऊबीजेच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या एकत्र येण्याचा काही राजकीय पक्षांनी धसका घेतल्याचे सांगितले जात आहे.
महायुतीमधील विशेषतः भाजप नेत्यांकडून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत उपाहासात्मक पद्धतीने बोलले जात आहे. याबाबत भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनीही त्याच पद्धतीने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत भाष्य केले. त्या म्हणाल्या, आज आमच्या देवाभाऊंमुळे (देवेंद्र फडणवीस) दोन भाऊ एकत्र येतात.
आपल्या सर्वांचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे देवाभाऊंना स्वर्गातून आशीर्वादच देत असतील. तुमच्यामुळे लोकांना दाखवण्यासाठी का असेना, राजकारणासाठी का असेना पण हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. मला तर आज सर्वांत जास्त आनंद त्यांच्या बहिणींसाठी आहे. कारण, ठाकरेंच्या बहिणींनी देवाभाऊंचे आभार मानले पाहिजेत. कारण इतके वर्षे ज्या बहिणी आपल्या भावाचे अभिष्टचिंतन करण्यापासून वंचित होत्या. त्या बहिणी आज शिवतीर्थवर एकत्र आलेल्या आहेत, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.
Q1. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत चर्चा का आहे?
A1. उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येत असून, आगामी निवडणुकीत याचा मोठा राजकीय परिणाम होणार आहे.
Q2. भाऊबीजच्या निमित्ताने काय घडणार आहे?
A2. ठाकरे घराण्याचे सर्व सदस्य शिवतीर्थवर एकत्र येऊन भाऊबीज साजरी करणार आहेत.
Q3. चित्रा वाघ यांनी कोणता दावा केला?
A3. त्यांनी म्हटले की देवेंद्र फडणवीसांमुळे ठाकरे भाऊ एकत्र आले असून, त्यांच्या बहिणींनी फडणवीसांचे आभार मानले पाहिजेत.
Q4. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
A4. या एकत्रिकरणामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांतील समीकरणे बदलू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.