
Mumbai, 09 December : विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी कोर्ट म्हणून (राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची या वादावर) न्यायदानाचं काम करताना कधीही दुजाभाव केला नाही. त्यांनी असा निकाल दिला की सर्वोच्च न्यायालयाला अजूनही त्यावर निकाल देता आलेला नाही. पण तुम्ही कोणालाही अपात्र (डिस्क क्वॉलिफाय) केले नाही, याबाबत तुमचे उशिरा का होईना आभार मानतो. सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही, त्यामुळे तुमचाच निर्णय मान्य करून आम्ही आता नवा डाव सुरू केला आहे, अशी कबुली देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नार्वेकरांचा निर्णय मान्य केला.
ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची विधानसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी नार्वेकर यांच्या न्यायालयीन कामाचे कौतुक केले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादावर ॲड. नार्वेकर यांनी दिलेला निवडा एक प्रकारे मान्य असल्याचे कबूल केले आहे.
जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, मागची अडीच वर्षे आपल्यासमोर अनेक गोष्टी झाल्या. कोर्ट म्हणून आपल्याला जास्त काळ काम करावं लागलं. दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वादावर आम्ही आपल्यासमोर आमची बाजू मांडायला लागलो. कोर्ट म्हणून न्यायदानाचं काम करताना त्यांनी आम्हाला अतिशय उत्तम सहकार्य केले. त्यांच्या बोलण्यात कधीही दुजाभाव दिसला नाही. उलट साक्ष देताना आम्ही जे बोललो त्यात दुरुस्ती करण्यासाठी ते आम्हाला मदत करायचे. फार संयमी असं काम त्यांनी केलं.
दोन राष्ट्रवादीतील वादावर त्यांनी असा निकाल दिला की सर्वोच्च न्यायालयाला अजूनही निकाल देता आलेला नाही. नार्वेकरांनी जो निर्णय दिला. त्याचा सर्वोच्च न्यायालय अजूनही विचार करत आहे. सुप्रीम कोर्टाचे एक सरन्यायाधीश निवृत्त होऊन घरी गेले. त्यांनी त्याला हात लावला नाही, भाष्यही केले नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.
तुमचे एका गोष्टीवर आभार मानले पाहिजेत. त्या वेळी कोणीची बाजू चांगली, कोण चुकीचे, काही का असेना. तुम्ही कोणालाही डिस्क क्वॉलिफाय कोणालाही केलेले नाही. त्याबद्दल उशिरा का होईना मी तुमचे आभार मानतो. आता सुप्रीम कोर्ट निकालच देत नाही, त्यामुळे आपले आभार मानणे आणि आपलाच निर्णय मान्य करून नवा डाव आम्ही आता सुरू केलेला आहे. त्या कामाला सुरुवात करणे, हा आमच्या समोरचा पर्याय आहे, अशी प्रांजळ कबुलीही जयंत पाटील यांनी दिली.
जयंत पाटील म्हणाले, आमचं तुम्हाला काय चॅलेंजच नाही. तुम्ही २३० वर आलेला आहात. तेवढ्यात सत्ताधारी बाकावरून २३७ असा आवाज आला. जयंतरावांनी करेक्शन करत २३७ वर आल्यात का, असे म्हणत तुम्ही तिघांनी मन एवढं मोठं केलं पाहिजे की, आपल्या बाजूने २३७ आहेत, असं न समजता हे २८८ सदस्यांचे सभागृह आहे, असे समजले पाहिजे.
आम्ही महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार यावर भाषणे केली. त्यानंतर जनतेने निर्णय तुमच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले पाहिजे, असेही जयंत पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.