

Pune News: पुण्यातील नसरापूर येथे तीन वर्षीय चिमुकलीचं अपहरण, तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर पुण्यासह संपूर्ण राज्य हादरलं होतं. संतापाची तीव्र लाट उसळली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले होते. तसेच चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची ग्वाही देतानाच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देश दिले होते. आता नसरापूर प्रकरणाचा अंतिम निकालाची तारीख समोर आली आहे. चिमुरडीला ऐतिहासिक इतिहासातील न्याय मिळणार आहे.
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा अंतिम निकाल हा येत्या 25 जूनला लागणार आहे. हा खटला इतिहासातील सर्वात जलद खटला ठरण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नसरापूर घटनेत गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 16 दिवसांत साक्षीदारांच्या साक्षी व पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकरणात 20 दिवसांत अंतिम युक्तिवादही पूर्ण करण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर खटल्याचा निकाल 25 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. या खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. हा खटला राज्यातील सर्वाधिक जलदगतीने चाललेल्या खटल्यांपैकी एक ठरला जाण्याची शक्यता आहे.
या घटनेतील मुख्य आरोपीनं चिमुरडीवर अत्याचार करून तिला संपवल्याची संतापजनक घटना समोर आली होती. मात्र, या प्रकरणी कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, आरोपीने स्वत:च्या बचावासाठी धक्कादायक आणि बनावट कथानक रचलं.
आरोपी भीमराव कांबळे म्हणाला,नसरापूर येथील घटनेच्या दिवशी मी राम मंदिरातून घायवळ्यांच्या शेडमध्ये गेलो, त्यावेळी तिथे मुलगी आली. तिला गाठी शेव दिली. तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला. ज्यामुळे मुलीच्या डोक्याला मार) लागला व ती रडू लागली. तिला खाटेवर झोपवले. ती ओरडत होती. लोक आरोप करतील, म्हणून मी तिला तिथेच सोडून निघून गेलो व काळूबाई मंदिराच्या कट्टयावर जाऊन बसलो, असा धक्कादायक जबाब या प्रकरणातील आरोपीनं कांबळेने कोर्टासमोर दिला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने स्वतःच्या बचावासाठी कोणताही पुरावा किंवा साक्षीदार तपासण्यासही नकार दिला.
तसेच नसरापूर घटनेतील वैद्यकीय अहवाल आणि डीएनए प्रोफाइलिंगच्या वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध केला. घटनेनंतर आरोपीच्या वर्तनातील संशयास्पद बाबी आणि त्याला यापूर्वीच्या खटल्यांमुळे असलेल्या कायद्याच्या ज्ञानाचा वापर करून त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न कसा केला, याचाही पर्दाफाश या घटनेतील वकिलांनी सुनावणीवेळी न्यायालयासमोर केला.
आरोपी भीमराव कांबळेने घटनेच्या दिवशी पीडित चिमुरडीला दुपारी 3 वाजून 12 मिनिटांनी घटनास्थळाकडे नेले. त्यानंतर, तो दुपारी 3 वाजून 51 मिनिटांनी घटनास्थळावरून एकटाच परत येत असल्याचं त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं होतं. या तांत्रिक पुराव्यावरून पीडिता ही 39 मिनिटं आरोपीच्या ताब्यात असल्याची बाब वकिलांनी अंतिम युक्तिवादावेळी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली.
याचदरम्यान, आरोपी भीमराव कांबळे याने पीडितेवर अत्यंत पाशवी व अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर, तिची निर्घृण हत्या करून मृतदेह लवपून ठेवल्याची माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयाला दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.