
Mumbai News : राज्य सरकारकडून क्षेत्रीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा आखला आहे. त्यावर सात कलमी कृती आराखडा राबवला जात आहे. या सात कलमी कार्यक्रमात कार्यालयातील सोयीसुविधा, कर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारीचे निवारण, गुंतवणुकीस प्रोत्साहन, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, संकेतस्थळ आदींचा समावेश आहे. त्यानुसार गेल्या तीन महिन्यापासून काम सुरु आहे. 15 एप्रिलच्या आसपास 100 दिवसाचा कालावधी पूर्ण होणार आहे. मात्र, या 100 दिवसाच्या कालावधीत कृती आराखडा कार्यक्रम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या आराखडयास 1 मे पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मुदतवाढ दिल्यानंतर तरी ही कामे पूर्ण होणार का? याची उत्सुकता लागली आहे.
राज्य सरकारकडून 7 जानेवारी 2025 रोजी 100 दिवसांसाठी ७ कलमी कृती आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिला होता. त्यामधून प्रशासनाला शिस्तीचा धडे मिळावेत हा त्या मागचा उद्देश होता. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात आला.
लवकरच या कृती आराखड्यास 100 दिवसपूर्ण होणार आहेत. त्यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचारी वर्ग कामाला लागला असतानाच नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये कामाचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या आराखडयास 15 दिवसाची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता या कामासाठी 1 मे पर्यंतची मुदत मिळणार आहे.
राज्य सरकारने या 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत 411 कामांची कार्यवाही पूर्ण केली आहेत, तर 372 कामे प्रगतीपथावर आहेत, जी लवकरच पूर्ण होतील, असे दिसते. त्यामुळे, मुदतवाढीनंतरही, राज्य सरकारचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
राज्यातील विविध विभागांनी या आराखड्याअंतर्गत 85 टक्के कामे पूर्ण केली आहेत, जी कौतुकास्पद आहे. 1 मे रोजी, सर्व विभागांकडून त्यांच्या संकेतस्थळावर शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती दिली जाणार आहे. राज्य सरकारच्या कृती कार्यक्रमाला 100 दिवसाची मुदत संपल्यानंतरही 15 दिवसाची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार सर्व विभागाने एक मे पर्यंत या आराखड्यानुसार कामे पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
प्रशासकीय विभागाने गतिमानतेने लोकप्रिय कामे गुणवत्तेचा निकाल म्हणून पूर्ण करावीत, लोकप्रतिनिधीच्या पत्रावर तत्परतेने कारवाई करण्यासाठी आपल्या स्तरावर नियंत्रणा कार्यवाही करावी. उद्दिष्ट गाठण्यासाठी तांत्रिक प्रशासकीय अनुषंगाने या बाबीचा तातडीने पूर्तता करावी व उपलब्ध नीतीचा सुयोग्य वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्या आहेत.
या कृती कार्यक्रमाला मुदतवाढ दिल्यानंतरही ही कामे पूर्ण करण्याचे टार्गेट कर्मचाऱ्यापुढे आहे. ही कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे आगामी काळात देण्यात आलेले हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही मुदतवाढ महत्वपूर्ण ठरणार असल्याने या मुदतीत तरी हे काम पूर्ण होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.