
Mumbai News : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. त्यामुळे महायुतीचा कॉन्फिडंस चांगलाच वाढला आहे. एक हाती विजय मिळवल्यानंतर राज्यात 5 डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. मात्र, सरकार स्थापनेपासून ते आतापर्यंत महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी मित्रपक्ष सोडत नसल्याने चर्चा रंगल्या आहेत.
भाजप (Bjp), शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये या-ना त्या कारणावरून नाराजी असल्याचे पुढे येत आहे. महायुतीची सत्ता राज्यात आल्यापासून एकनाथ शिंदे यांची नाराजी लपून राहिलेली नाही. महायुतीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. महायुतीत पालकमंत्रीपद वाटपाबाबतही दुजाभाव झाल्याची भावना काही शिवसैनिकांकडून व्यक्त केली. रायगडमध्ये तर मोठा वाद उफाळून आलेला बघायला मिळाला. त्यामुळे या सगळ्या घडामोडींमधूनच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा जोरात रंगली आहे.
रायगड, नाशिक येथील पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवासी यांनी या दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्रीपदाची स्थगिती दिली आहे. गेल्या चार पाच दिवसापासून पालकमंत्रीपद आपल्याच वाटेला यावेत, म्हणून रस्सीखेच सुरु आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसापासून रायगडवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे व शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यात चूरस आहे. दुसरीकडे नाशिकवरून तीन पक्षात रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला गेला आहे. हा वाद अजूनच चिघळण्याची शक्यता आहे. रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही थांबायचे नाव घेत नाही. अशातच रायगडमधील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी अजित पवारांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र, मंत्रालयाच्या दारातूनच त्यांना परत फिरावे लागले. अजित पवारांनी रायगडच्या तीन आमदारांची भेट नाकारली आहे. भेट झाली नसली तरी गोगावलेंनी पालकमंत्रिपदावर दावा कायम ठेवला आहे. येत्या दोन दिवसांत रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय होणार असल्याचं भारत गोगावलेंनी सांगितले. त्यामुळे भेट नाकारली असल्याने ते काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
फडणवीसांनी केलेल्या पालकमंत्रीपदाच्या घोषणेनंतर शिवसेनेच्या विरोधामुळे अवघ्या काही तासात आदिती तटकरेंच्या नावाला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनाचं ध्वजवंदन आदिती तटकरेंच्या हस्ते पार पडल्यानंतर आता शिवसेना (Shivsena) अधिकच आक्रमक झाली आहे. दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे यांच्यात कोणाची वर्णी लागणार ? याची उत्सुकता आहे. त्यामुळे तीन पक्ष एकमेकांचे ऐकण्यास तयार नाहीत. त्यामुळे यावर कसा मार्ग काढला जाणार याची उत्सुकता शिगेला पोंहचली आहे.
दुसरीकडे पुण्यातील डीपीडीसीमध्ये शिवसेना शिंदे गटाला वगळण्यात आल्याने माजी मंत्री शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली होती. डीपीडीसीमध्ये त्यांना स्थान मिळेल, असे वाटत होते. मात्र, त्यांना वगळण्यात आल्याने आता येत्या काळात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
बीडमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडूनच मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सोळंखे व शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेरले आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येत धनंजय मुंडेंना घेरले आहे. त्यामुळे हे सर्व प्रकार पाहता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले असून एकमेकांवर कुरघोडीमुळे येत्या काळात तीन पक्षांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.