Uddhav Thackeray speech : लोकसभेला कमावले, ते विधानसभेला गमावले; उद्धव ठाकरेंनी पराभवाचे थेट कारणच सांगितले

Maharashtra elections news : लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसलं तरी उमेदवार होते, विधानसभेला चिन्ह होतं, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानापुर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हतं.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumabai News : राज व उद्धव ठाकरे हे बंधू मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल करीत कारभारची वाभाडे काढली. त्यांनी सामनाच्या महामुलाखतीतून सत्ताधारी मंडळींवर जोरदार टीका केली. विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली 'तू तू मैं मैं' झालं. त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला.

लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसलं तरी उमेदवार होते, विधानसभेला चिन्ह होतं, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानापुर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हतं. ही चूक होती असे सांगत लोकसभेला जे कमावले होते ते विधानसभेला गमावले, असे सांगत निवडणुकीतील पराभवाचे थेट कारणच सांगितले.

सामनाच्या महामुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग, केंद्र सरकारचा कारभार, राज्य सरकारचा कारभार,भाजपचे धोरण त्याशिवाय लोकसभा निवडणुकीतील यश तर विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश यावरील सर्वच प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. त्याशिवाय ठाकरे बंधू मेळाव्याच्या निमित्ताने २० वर्षानंतर एकत्र आले असले तरी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढवणार? का याचे उत्तर देखील दिले.

Uddhav Thackeray
Sarkarnama Exclusive : शिंदे पक्ष भाजपमध्ये विलीन करणार? मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पूर्ण होणार? रवींद्र चव्हाणांचं सडेतोड उत्तर

शिवसेना नाव, चिन्ह इतरांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, अशी घणाघाती टीका करताना त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यासोबतच केंद्रातील भाजप सरकारचे देश अशांत, अस्थिर ठेवायचा धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 75 वर्षे भरत असल्याचा इशारा सरसंघचालकांनी दिलाय, यावर भाष्य करीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

Uddhav Thackeray
BJP Politics : देवेंद्र फडणवीसांना इशारा दिल्यानंतर राज ठाकरेंवर भाजपकडून पहिला वार; म्हणाले, 'निवडणुका आल्या की...'

'तू तू मैं मैं'चा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला

यावेळी जे तुम्ही लोकसभेला कमावले होते, ते विधानसभेला गमावले. फक्त सहा महिन्यांत हे कसे घडले?, असा प्रश्न मुलाखतीवेळी खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. यावर विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. 'तू तू मैं मैं' झाले. त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला हे स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
NCP Politics : काका-पुतण्यांना एकत्र येण्यापूर्वी 'भाजपला' विचारात घ्यावं लागेल : राष्ट्रवादी विलीनीकरणावर तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं!

फसव्या ठरलेल्या योजनाचा परिणाम

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मतदार कसे वाढले हे लोकांसमोर आले आहे. 'लाडकी बहीण'सारख्या आता फसव्या ठरलेल्या योजना याचा परिणाम झाला. निवडणूक मोठी असली की, वाद थोडे कमी असतात. निवडणुकीचा मतदारसंघ छोटा झाला की, स्पर्धा वाढत जाते. लोकसभेच्यावेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली. आम्ही त्या वेळी चार-चार, पाच-पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ 'आपल्याला जिंकायचंय' म्हणून सोडून दिले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Raj Thackeray Warns Devendra Fadnavis : 'तडजोड करणार नाही याच्याआधी....', राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा

महाविकास आघाडीत निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपावरून खेचाखेची झाली. सगळ्या गोष्टींत हात वर करण्यात अर्थ नाही. काही गोष्टी जबाबदारीने स्वीकारल्या पाहिजेत. ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी, बोगस मतदार या सगळयांवर आता चर्चा सुरू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

लोकसभेचे यश डोक्यात गेले

विधानसभा निवडणुकीच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली 'तू तू मैं मैं' झाले. त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला. लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसले तरी उमेदवार होते, विधानसभेला चिन्ह होते, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानापुर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हते. ही चूक होती. ती पुढे सुधारली पाहिजे. ती चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला अर्थ राहत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Raj Thackeray Vs Nishikant Dubey : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतरही निशिकांत दुबेंने पुन्हा डिवचले, म्हणाले, 'हिंदी सिखा...'

दुसरीकडे समन्वयाचा अभाव होता का?, असे संजय राऊतांनी विचारले. यानंतर समन्वयाच्या अभावापेक्षाही लोकसभेचे यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेले होते, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचं आहे हे आपलेपण होते, विधानसभेला मला जिंकायचंय हा आपल्यात जो 'मी'पणा आला त्यामुळे पराभव झाला. त्यात शेतकरी कर्जमाफी वगैरे तांत्रिक बाबी होत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
Raj-Uddhav Thackeray Alliance: राज सोबत आहे...; राजकीय युतीवर उद्धव ठाकरेंकडून अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com