
Nashik News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी गुढीपाडव्याचा मेळावा घेतला. त्या मेळाव्यात त्यांनी केलेले भाषण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. राज ठाकरे यांनी समाजाचे कान टोचले, सत्ताधाऱ्यांना जमेल का याचीच होतेय चर्चा.
नुकताच झालेल्या प्रयागराज येथील कुंभमेळ्याचे भारतीय जनता पक्षाने राजकीय मायलेज घेतले. जे कुंभमेळायला गेले नाही त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. तर याच विषयावर राज ठाकरे यांनी भाजपचे अक्षरशा पोस्टमार्टम केले. त्यांनी आरोग्य आणि प्रदूषण या गंभीर प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले.
नाशिकला येत्या दोन वर्षांनी कुंभमेळा होत आहे. पार्श्वभूमीवर गोदावरी स्वच्छतेचा प्रश्नतिडकीने मांडला जात आहे. साधू महंत यांनीही याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. अन्य जनता त्रस्त झाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नेमके याच प्रश्नावर बोट ठेवले आहे.
यानिमित्ताने त्यांनी हिंदू धर्मातील प्रथा आणि परंपरा नद्यांच्या प्रदूषणास कारणीभूत होत आहेत. सरकारने काही वेगळा विचार का केला नाही. सांडपाणी आणि उद्योगांचे रसायने मिश्रित पाणी थेट नदीत सोडले जाते. उद्योगांच्या वाढीसाठी हे योग्य आहे का? की कोणाच्यातरी फायद्यासाठी होत आहे, याची चर्चा या निमित्ताने घडली.
समाज माध्यमांपासून तर प्रबोधनाच्या अनेक उपक्रमातून प्रदेशातील नद्या आणि भारतातील नद्या यांची तुलना सातत्याने केली जात आहे. भारतात नद्यांना माता आणि देवी मानले जाते. त्यांची दुर्दशा पहावत नाही. प्रदेशात नद्यांना देव मानले जात नाही. मात्र नद्या म्हणून त्यांची जपणूक अतिशय चांगली केली जाते. हाच फरक राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मांडला.
यानिमित्ताने त्यांनी गंगा आणि अन्य नद्यांच्या प्रदूषणाची भीषण अवस्था मांडली. संगीत अनेक गैरप्रकार आणि प्रदूषणाचे प्रकार होत आहेत. हिंदूंच्या धार्मिक परंपरा वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करून बदललेल्या पाहिजेत. शिस्ता लाकडे जाळून होणारे अंत्यसंस्कार रोखले पाहिजेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. हे पारंपारिक राजकारणाला साजेशे नाही. यातून हिंदुत्वाचे राजकारण करणारे दुखावले जाऊ शकतात. मात्र याचा विचार न करता राज ठाकरे यांनी आपली परखड भूमिका मांडली आहे. मतांपेक्षा व्यवस्था आणि निसर्गाची चिंता करणारा नेता म्हणून राज ठाकरे हे पहिलेच असावेत. त्यामुळेच गोदावरी प्रदूषणावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या नाशिकच्या नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.